Maharashtra din in marathi | १ मे महाराष्ट्र दिन माहिती मराठी

Maharashtra Day Information In Marathi 202४ – मराठी मानस आपल्या राज्यावर (महाराष्ट्रावर) जीवापाड प्रेम करीत असतात. तसेच मराठी लोकांसाठी महाराष्ट्र दिवस (Maharashtra Din) खुप जीव्हाळ्याचा.आणि आनंदाचा विषय आहे कारण या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली. मराठी माणस आपल्या जन्मभूमीचा आदर करतात त्याचबरोबर महाराष्ट्राचा अभिमान बाळगतात. तसेच महाराष्ट्राच्या सुरक्षेबद्दल त्यांची भावना खूप तीव्र स्वरूपाची असते. मराठी लोकांनी वेगळ्या राज्याच्या मागणीच्या चळवळीला सदैव पाठिंबा दिल्यामुळे, केंद्राने संसदेमद्ये महाराष्ट्राच्या मागणीच्या ठरावाला पास केले आणि सन १९६० रोजी मराठी लोकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली.

भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता आणि भारतातील अनेक राज्ये सारखीच होती. पण हळूहळू ही राज्ये भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर विभागली गेली आणि अशा प्रकारे भारतात अनेक नवीन राज्ये निर्माण झाली. सध्या आपल्या देशात २९ राज्ये आहेत, ज्यांची स्वतःची भाषा आणि वेशभूषा आहेत. त्याच वेळी, भारतातील जवळजवळ सर्व राज्ये देखील दरवर्षी त्यांच्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करतात आणि त्याच प्रकारे, महाराष्ट्रात, दरवर्षी मे महिन्यात स्थापना दिवस साजरा केला जातो. तसेच मराठी लोक एकमेकांना महाराष्ट्र दिनाचे शुभेच्छासंदेश पाठवीत असतात.

राज्यमहाराष्ट्र
निर्मिती१ मे १९६०
राजधानीमुंबई
उपराजधानीनागपूर
विधानमंडळद्विगृही (विधानसभा व विधानपरिषद)
मुख्यमंत्रीमाननीय एकनाथजी शिंदे
राज्यपालरमेश बैस
राज्यप्राणीशेकरू
राज्यपक्षीहरोळी / हरियाल
राज्यफूलताम्हण
राज्यफळआंबा

वर्षाला कोणत्या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा करतात | Maharashtra Din date in marathi

दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्रातील लोक महाराष्ट्र दिन साजरा करतात. याच दिवशी म्हणजे १ मे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि या राज्याला भारत देशाचे राज्य म्हणून मान्यता मिळाली. तेव्हापासून महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. या दिवशी राज्यातील शाळा, विद्यापीठे आणि सरकारी कार्यालयांना राज्य सरकारकडून सुट्टी दिली जाते. त्याचवेळी, यावर्षी २०२४ ला हे राज्य आपला ६४ वा राज्य स्थापना दिन साजरा करणार आहे.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली ?

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर बहुतांश प्रांतीय राज्ये बॉम्बे प्रांतात विलीन करण्यात आली. त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. त्याचवेळी या भाषांच्या आधारे वेगवेगळी राज्य निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली.

मराठी भाषा बोलणारे लोक स्वत:साठी वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी करायला लागले. त्याचवेळी गुजराती भाषेतील लोकांना स्वतःचे वेगळे राज्य हवे होते. या दरम्यान देशात अनेक आंदोलनेही झाली आणि या चळवळींचा परिणाम म्हणून १९६० मध्ये मुंबई पुनर्रचना कायदा, १९६० अंतर्गत महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली. म्हणजेच महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य हे पूर्वी एकच राज्य म्हणून ओळखले जायचे.

वास्तविक पाहता अनेक राज्ये “राज्य पुनर्रचना कायदा” १९५६ अंतर्गत निर्माण झाली. या कायद्याच्या आधारे कन्नड भाषा बोलणाऱ्या लोकांना म्हैसूर राज्य म्हणजेच कर्नाटक राज्य देण्यात आले. तेलुगू भाषेतील लोकांना आंध्र प्रदेश राज्य मिळाले. त्याच वेळी मल्याळम भाषेच्या लोकांना केरळ आणि तमिळ भाषेच्या लोकांना तामिळनाडू राज्य मिळाले. पण मराठी आणि गुजराती लोकांना स्वतःचे वेगळे राज्य मिळाले नाही. त्यानंतर या लोकांनी स्वत:साठी स्वतंत्र राज्याची मागणी करीत अनेक आंदोलने सुरू केली

१९६० मध्ये जिथे एका बाजूला गुजरात राज्य निर्माण करण्यासाठी महागुजरात चळवळ सुरू झाली. त्याचवेळी महाराष्ट्र राज्याच्या मागणीसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली.

१ मे १९६० रोजी भारताच्या विद्यमान सरकारने बॉम्बे राज्याचे दोन राज्यांमध्ये विभाजन केले. मराठी भाषिक लोकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि गुजराती भाषिक लोकांसाठी गुजरात राज्याची निर्मिती झाली.

पण त्याच दरम्यान या दोन राज्यांमध्ये बॉम्बेवरून भांडण सुरू झाले, महाराष्ट्र राज्यातील लोकांना मुंबई हा त्यांच्या राज्याचा भाग हवा होता, कारण तेथील बहुतांश लोक मराठी बोलत असत . त्याचवेळी मुंबईच्या प्रगतीत आपला जास्त हात असल्याचे गुजराती लोकांनी म्हटले. त्यामुळे तो त्यांच्या राज्याचा भाग असावा असे ते म्हणत. परंतु शेवटी बॉम्बे महाराष्ट्राचा भाग बनला आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली.

महाराष्ट्र दिवस (Maharashtra Din) साजरा करण्याचा उद्देश.

  • महाराष्ट्राच्या निर्मितीचा उत्सव –

हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांना त्यांच्या पूर्वजांनी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी केलेल्या कठोर प्रयत्नांची जाणीव करून देणे होय. महाराष्ट्रातील सामान्य मराठी माणसे हा दिवस (Maharashtra Din/Maharashtra Day) साजरा करण्यासाठी एकत्र येत असतात.

  • मराठी लोकांना एकत्र आणणे –

हा दिवस साजरा करताना समाजातील प्रत्येक वर्गातील लोकांना एकत्र येण्याची आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमद्ये सहभागी होण्याची संधी मिळत असते. यामुळे मराठी लोकांमद्ये जिव्हाळा वाढीस लागतो.

  • मराठी संस्कृती आणि वारसा साजरे करण्याचे व्यासपीठ

मराठी मानस त्यांच्या समृद्ध संस्कृती आणि वारस्यासाठी ओळखले जातात. हा दिवस साजरा करताना येथील लोक स्थानिक नृत्य आणि गायनाचा आनंद घेत असतात. जे या राज्याला ओळख देतात.

महाराष्ट्र दिन कशाप्रकारे साजरा केला जातो | How to celebrate Maharashtra din

महाराष्ट्र दिनाचा दिवस विशेष व्हावा यासाठी राज्य शासनातर्फे येथे अनेक प्रकारचे सोहळे आयोजित केले जातात. हा दिवस खास बनवण्यासाठी राज्य सरकार अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करते, ज्यामध्ये मराठी संस्कृतीची झलक पाहायला मिळते. याशिवाय राज्य सरकारतर्फे या दिवशी परेडही काढण्यात येते. दरवर्षी ही परेड शिवाजी पार्कमध्ये आयोजित केली जाते. एवढेच नाही तर शिवाजी पार्कमध्ये दरवर्षी या दिवशी राज्यपालांचे भाषणही केले जाते.

त्याचवेळी, या राज्याच्या स्थापनेसाठी ज्यांनी योगदान दिले त्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री ‘हुतात्मा चौक’ला भेट देतात. वास्तविक महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या आंदोलनात शहीद झालेल्या लोकांच्या स्मरणार्थ हा चौक बांधण्यात आला आहे. याशिवाय या दिवशी राज्यात मद्यविक्री होत नाही.

शाळांमध्येही विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात

शालेय विद्यार्थ्यांना या दिवसाचे महत्त्व कळावे यासाठी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एवढेच नाही तर मुले या दिवशी अनेक प्रकारचे नृत्य आणि गाणी सादर करतात. त्याचबरोबर राज्यातील शाळांव्यतिरिक्त महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्येही अनेक प्रकारचे उत्सव आयोजित केले जातात. मात्र, या दिवशी राज्य सरकारकडून सुट्टी दिली जाते. म्हणूनच हे सर्व कार्यक्रम एक दिवस अगोदर केले जातात.

महाराष्ट्राची महत्वाची माहिती.

विधानमंडळ : महाराष्ट्रचे विधानमंडळ हे द्विगृही आहे. विधानसभा आणि विधानपरिषद

विधानसभा : भारताच्या राजकारणात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 228 जागा आहेत. त्याच वेळी, लोकसभेच्या 543 जागांपैकी 48 जागा या राज्याच्या आहेत आणि हे लहान सभागृह आहे.

विधानपरिषद : राज्यात विधानपरिषदेच्या ७८ जागा आहेत त्याचबरॊबर या राज्यात राज्यसभेच्या 19 जागा आहेत. या सभागृहाला मोठे सभागृह म्हणतात.

महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्र 307,713 किमी इतके पसरले आहे. क्षेत्रफळाच्या आधारावर महाराष्ट्र राज्य हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रपुर्वी राजस्थान आणि मध्य प्रदेश ही क्षेत्रफळाच्या आधारावर भारतातील सर्वात मोठी राज्ये आहेत.

सह्याद्री पर्वत ही महाराष्ट्राची ओळख आहे. या सह्याद्रीच्या रायगडावर स्वराज्याचे निर्माते, महाराष्ट्राचे जनक, मराठी माणसाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला.

गोदावरी, भीमा, कृष्णा. कोयना, वैनगंगा या महाराष्ट्रातील काही मुख्य नद्या आहेत.

महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग : महाराष्ट्राचे एकूण पाच विभाग आहेत. विदर्भ, मराठवाडा, खान्देश (उत्तर महाराष्ट्र), कोकण, पश्चिम महाराष्ट्र.

महाराष्ट्र राज्याचा दक्षिण भाग कर्नाटक राज्याला लागून आहे. त्याच वेळी, या राज्याचा आग्नेय भाग आंध्र प्रदेश आणि गोवा राज्याच्या सीमेला लागून आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्याचा उत्तरेकडील भाग मध्य प्रदेश राज्याला जोडलेला आहे आणि राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे.

वारकऱ्यांचे श्रद्धास्थान विठ्ठल रुख्माई मंदिर पंढरपूरला आहे.नागपूरला दीक्षाभूमी आहे. दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरण केले.

महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन नागपूरला तर उन्हाळी/पावसाळी अधिवेशन मुंबईला भरते.

FAQ

प्रश्न – महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ?

उत्तर – १९६० साली महाराष्ट्राची स्थापना झाली

प्रश्न – १९६० मध्ये महाराष्ट्रात किती जिल्हे होते ?

उत्तर – २६

प्रश्न – महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण ?

उत्तर – यशवंतराव चव्हाण

प्रश्न – महाराष्ट्राला किती राजधान्या आहेत ?

उत्तर – दोन (मुंबई आणि नागपूर)

प्रश्न – महाराष्ट्रात किती प्रांत आहेत ?

उत्तर – पाच

Leave a Comment